Pushpaच्या आधी Allu Arjunचा एकही चित्रपट कधी पॅन इंडिया का प्रदर्शित झाला नाही ?

पुष्पाच्या आधी अल्लू अर्जुनचा एकही चित्रपट संपूर्ण भारतात प्रदर्शित झाले नाही कारण बाहुबलीच्या नंतर ही ट्रेंड देशात मोठ्या प्रमाणात तयार झाली,या आधी रजनीकांत,कमल हसन यांचे चित्रपट केवळ हिंदीत प्रदर्शीत होत असत,पण हिंदी डब पात्र इतर भाषेतील लोकांना जवळचे वाटत नव्हते, त्यामुळे पाच ते अनेक भाषेत प्रदर्शित केल्या नंतर चित्रपट निर्मात्यांना आणि अभिनेत्यांना स्वतःसाठी एक मोठा आधार तयार झाला. २०२१ मधील पुष्पाच्या यशाने अल्लू अर्जुनचा पॅन-इंडियन स्टार म्हणून दर्जा मजबूत करण्यात मदत केली.

Pushpa 2 Movie Allu Arjun





पॅन इंडीयन चित्रपटांची निर्मिती संपूर्ण भारताच्या दृष्टिकोनातून केली जाते, अनेक भाषांमध्ये डब केले जाते आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मार्केटिंग केले जाते. या दृष्टिकोनामुळे त्यांना भारतामध्ये आणि भारताबाहेरही कामगिरी करण्यास मदत होते

(प्रभासचा देखील बाहुबलीच्या आधी एकही चित्रपट संपूर्ण देशात पॅन इंडीयन प्रदर्शित झाला नाही)  


अनेक बॉलिवूडदास मराठी प्रेक्षक म्हणतात की मराठी चित्रपट कमी दर्जाचे असतात वगैरे,पण तुमच्या माहितीसाठी सांगतो KGF(२०१८)च्या आधी अभिनेता यशचा एकही चित्रपट कधी १०० कोटी कमावला नाही,kgfच्या आधी एकही कन्नड चित्रपट १०० कोटी कमवू शकला नाही,उलट त्याआधी २०१६ ला सैराटने ११० कोटी कमावले होते

मल्याळममध्ये तर २०१३ मधील "दृश्यम"च्या आधी ५० कोटी कमाईचा एकही सिनेमा नव्हता,आणि २०१६ चा "पुळीमुरूगन" हा त्यांचा पहिला १०० कोटी कमाईचा चित्रपट आहे, २०२१च्या आधी मल्याळममध्ये तर एक पण पॅन इंडियन चित्रपट नाही,मग त्याचा अर्थ असा होतो का की कन्नड,मल्याळम मध्ये त्याआधी दर्जेदार चित्रपट नव्हते ? 

तामिळ मधील "शिवाजी द बॉस" हा २००७ चा त्यांचा पहिला १०० कोटी कमाईचा चित्रपट होता,तेलुगूमधील "मगधिरा" हा २००९ मधील त्यांचा पहिला १०० कोटी पार केलेला चित्रपट होता मग त्याआधी तामिळ तेलुगूत दर्जेदार चित्रपट नव्हते का ?

       

मराठी चित्रपट का चालत नाहीत 

यशचे सगळे चित्रपट मराठी सारखेच कमी बजेटचे होते(९०% सगळे कन्नड चित्रपट मराठी सारखे कमी बजेटचे असतात) पण त्याचे चित्रपट लोक आवर्जून पहायचे त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा kgf जास्त बजेटमध्ये निर्माण केला आणि त्यांचा २०१८ मधील पहिला पॅन इंडियन चित्रपट ठरला आणि कन्नड मधील पहिला १०० कोटीचा चित्रपट ठरला(एकूण २५० कोटी),यशचा "मिस्टर अँड मिसेस रामाचारी"चा रिमेक मराठीत आहे उत्तम चित्रपट होता नाव "मिस्टर अँड मिसेस सदाचारी" कन्नड मध्ये हा चित्रपट ५० कोटी तर मराठीत केवळ ३ कोटी कमाई झाली, दोन्ही चित्रपट सारखेच बजेटमध्ये काहीच फरक नाही ,यावरून एकच लक्षात येते की मराठी प्रेक्षक फुकटचे आपल्याचं चित्रपटांना नावे ठेवतात,तसे असते तर kgfच्या आधी यशचे सगळे चित्रपट १०० कोटी कमाई झाले पाहिजे होते, मल्याळम मध्ये पण पुळीमुरूगनच्या आधी सगळे चित्रपट १०० कोटी कमाईचे असायला हवे होते.


पुष्पाच्या आधी अभिनेता अल्लु अर्जुनचा एकही पॅन इंडीयन चित्रपट कधीच प्रदर्षित झाला नाही,मग त्याचे सगळे यशस्वी तेलुगु चित्रपट कोणी पाहिले ? याबद्दल मराठी प्रेक्षकांनी विचार करायची नितांत गरज आहे


मराठीतील काही दर्जेदार चित्रपट


नटसम्राट ( Natsamrat Movie ) लय भारी ( Lai Bhari Movie ) लोकमान्य ( Lokmanya movie ) मी शिवाजीराजे भोसले बोलतोय (mi Shivrajiraje Bhosale boltoy movie ) ठाकरे ( Thakre Movie )कट्यार काळजात घुसली ( Katyar Kaljat ghusali movie ) आणि डॉ काशिनाथ घाणेकर ( ani Dr Kashinath ghanekar movie ) मी वसंतराव ( mi vasantrav movie ) सैराट ( Sairat movie ) नटरंग ( Natrang Movie ) माऊली ( Mauli Movie ) झोंबीवली ( Zombivali Movie ) झिम्मा.... ( Zimma Movie ) इतर अनेक  

मोठी यादी आहे पण दुर्दैव आहे मराठी लोकांना ते दिसत नाहीत केवळ नावे ठेवण्यात धन्यता मानतात. 

All rights to the images used in this Website belong to copyright to their respective owners.

Comments

Popular posts from this blog

संगीत मानापमान हा चित्रपट नाहीच...तर? Sangeet Manapaman Movie Review

चिकी चिकी बुबुम बूम चित्रपट आहे की महाराष्ट्राची हास्यजत्रा